मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजना तक्रार

 प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात 2016 पासून राबविण्यात येत आहे.  योजनेची उद्दिष्टे १. नैसर्गिक आपत्ती किडी आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. २. पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ३. कृषी क्षेत्रासाठी च्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकाचे विविधकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.   खरीप हंगाम  भात,ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर,मका, भुईमूग, कारळे, तीळ,सूर्यफूल,सोयाबीन,कापूस,कांदा.  रब्बी हंगाम  ज्वारी, हरभरा, उन्हाळी,भुईमूग,  कांदा इ पिकांचा समावेश आहे.  जर आपण प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये भाग घेतला असेल आणि  आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर 72 तासाच्या आत आपल्याला कंपनीला फोन कॉल, ई-मेल  किंवा ॲप माध्यमाद्वारे आपल्या पिकनुकसानीची  माहिती  द्यावी लागते. शासनाने जिल्हा निहाय विमा कंपन्या...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला मिळाली मंजुरी आता सर्वांना मिळणार फळबाग लागवड ...

              आज भारताची लोकसंख्या १२५ कोटी पेक्षा जास्त आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार  अन्न धान्य, भाजीपाला, फळे यांची गरज  वाढत आहे. त्यानुसार गरजांची पूर्तता होण्यासाठी कृषी क्षेत्रांतुन अधिक उत्पादन होणे अपेक्षित आहे. तसेच पडीक क्षेत्रावर, शेताच्या बांधावर, लागवड होणे गरजेचे आहे. या उद्देशाने   महाराष्ट्र शासन कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी सांगड घालून फळबाग लागवड योजना राबवत आहे. परंतु ही योजना फक्त जॉब कार्ड धारक करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी फक्त २.०० हे. मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकतात. त्यामुळे बहुतेक शेतकरी वरील अटी मुळे इच्छा असूनही लाभ घेऊ शकत नाही.         २०१८ पासून ही  योजना चालू केली होती. पण मध्ये काही वर्ष निधी उपलब्ध न झाल्यामुळं स्थगित केली होती पण ४ ऑक्टोबर २०२२ रोजी शासन निर्णय काढून पुन्हा प्रशासकीय मंजुरी  सन  २०२२-२०२३ साठी दिली आहे.  उद्देश  शेतकर्याना...