मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंबा फळ पीक विमा फक्त शेवटचे १० दिवस बाकी

 आंबा फळ पीक विमा फक्त शेवटचे १० दिवस बाकी  नमस्कार शेतकरी बंधुनो आंबा या फळाला फळांचा राजा म्हटलं जात. परंतु सध्याचे वातावरण पाहता विविध हवामान धोक्यामुळे या फळपिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.  या बाबीचा विचार करूनच फळपीक नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत  हवामान आधारित फळपीक विमा शासन राबावत आहे.  वय  आंबा या पिकासाठी ५ वर्ष वयाचे झाडाचा विमा उतरवू शकता.  हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी  कोकण विभागासाठी  १. अवेळी तापमान -१ डिसेंबर ते १५  मे  २. कमी तापमान  -१ जानेवारी ते १० मार्च  ३. जास्त तापमान  - १ मार्च ते १५ मे  ४. वेगाचा वारा - १६ एप्रिल ते १५ मे  ५. गारपीट - १ फेब्रुवारी ते ३१ मे  कोकण वगळून इतर विभागासाठी  १. अवेळी तापमान -१ जानेवारी ते ३१  मे  २. कमी तापमान  -  १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी  ३. जास्त तापमान  - १...

७/१२ व ८अ साठी तलाठी ऑफिस ला जायची आवश्यकता नाही. आता मोबाईल वरच काढा डिजिटल ७/१२ डाउनलोड.

नमस्कार शेतकरी बंधुनो आपल्याला नेहमीच ७/१२ व ८अ ची गरज भासत असते. आता बऱ्याच  ठिकाणी स्कॅन केलेले  ७/१२ व ८ अ ऑनलाईन दयावे लागतात. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या ७/१२ व ८अ काढता येणार आहे. हे ७/१२ डिजिटल असल्यामुळे त्यावर तुम्हाला तलाठी च्या  सहीची आवश्यकता नाही. तुम्ही डाउनलोड केलेले ७/१२ व ८अ सर्व शासकीय कामासाठी वापरता येणार आहे. खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या शेताचे ७/१२ व ८अ  काढू शकता.  digitalsatbara.mahabhumi.gov.in  वर जा.Regular Login मध्ये जाऊन तुम्ही तुमचा Login Id व Password  तयार करून घ्या. किंवा  OTP Based Login वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका व OTP  टाकून लॉगिन करू शकता. यामध्ये तुम्ही डिजिटल ७/१२, ८ अ , डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड व डिजिटल स्वाक्षरी केलेले इ फेरफार काढू शकता.  👉 ७/१२ काढण्यासाठी  जिल्हा  तालुका  गाव  सर्वे नंबर/ गट नंबर सर्वे नंबर/ गट नंबर हिस्सा निवडा.  👉 ८ अ  काढण्यासाठी  जिल्हा  तालुका  गाव  खाते क्रमांक (माहित नसल्यास नावानुसार शो...

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत शेततलाव

  मुख्यमंत्री शाश्वत कृषी कृषि सिंचन योजने अंतर्गत शेततलाव       एकूण ८२ टक्के शेतकरी सर्वस्वी अवलंबुन असलेली कोरडवाहू शेती आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित खंड हि नैसर्गिक आपत्ती आहे. यासाठी सिंचनाची  सोया व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेकऱ्यांसाठी शेत तलावाची योजना सुरू केली आहे. सन २०२२ - २३ या आर्थिक वर्षाकरिता १३५०० वैयक्तिक शेततळे करण्याचे उद्दिष्ट ठरले आहे. पात्रता १. अर्जदार स्वत:च्या नावावर ०.६० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे २. अर्जदाराची जमीन तांत्रिक दृष्टया योग्य असावी. ३. शेतकरी अर्जदाराने या पूर्वी शेत तलावासाठी इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  अर्ज सादर करण्याची पद्धत  कृषी विभाग महाडीबीटी या पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावे.   लाभार्थी निवड  कृषी विभागाने विकसित केलेल्या mahadbt पोर्टल वर प्राप्त अर्जाची सांगणकीय प्रणाली द्वारे सोडत निघेल.  कागदपत्र फक्त करण्यासाठी १. ७/१२ २.८अ ३.आधार कार्ड ४. पासबुक ५. मोबाईल नंबर   इनलेट आउटलेटसह व इनलेट आउट लेट व...