केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात 24 फेब्रुवारी ला हप्ता वितरीत केला जाणार आहे. PM KISAN योजना ही भारत सरकारची एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचे 18 हप्ते देण्यात आले आहेत.
राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एकदा अर्ज केल्यानंतर पुढील पाच वर्षे म्हणजेच २०२५-२६ पर्यंत तोच अर्ज लागू राहील. अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असल्याने अर्ज भरताना नोंदवलेला मोबाईल क्रमांक बदलू नये. त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत योजना अंतर्गत लाभ १.दुधाळ गाई - म्हशीचे गट व...