मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुधाळ गायी म्हशी गट , शेळी मेंढी गट, पोल्ट्री साठी अनुदान

  राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.  विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत  प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एकदा अर्ज केल्यानंतर पुढील पाच वर्षे म्हणजेच २०२५-२६ पर्यंत तोच अर्ज लागू राहील.    अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असल्याने अर्ज भरताना नोंदवलेला मोबाईल क्रमांक बदलू नये.  त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत योजना अंतर्गत लाभ  १.दुधाळ गाई - म्हशीचे गट व...

आंबा फळ पीक विमा फक्त शेवटचे १० दिवस बाकी

 आंबा फळ पीक विमा फक्त शेवटचे १० दिवस बाकी  नमस्कार शेतकरी बंधुनो आंबा या फळाला फळांचा राजा म्हटलं जात. परंतु सध्याचे वातावरण पाहता विविध हवामान धोक्यामुळे या फळपिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.  या बाबीचा विचार करूनच फळपीक नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत  हवामान आधारित फळपीक विमा शासन राबावत आहे.  वय  आंबा या पिकासाठी ५ वर्ष वयाचे झाडाचा विमा उतरवू शकता.  हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी  कोकण विभागासाठी  १. अवेळी तापमान -१ डिसेंबर ते १५  मे  २. कमी तापमान  -१ जानेवारी ते १० मार्च  ३. जास्त तापमान  - १ मार्च ते १५ मे  ४. वेगाचा वारा - १६ एप्रिल ते १५ मे  ५. गारपीट - १ फेब्रुवारी ते ३१ मे  कोकण वगळून इतर विभागासाठी  १. अवेळी तापमान -१ जानेवारी ते ३१  मे  २. कमी तापमान  -  १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी  ३. जास्त तापमान  - १...

७/१२ व ८अ साठी तलाठी ऑफिस ला जायची आवश्यकता नाही. आता मोबाईल वरच काढा डिजिटल ७/१२ डाउनलोड.

नमस्कार शेतकरी बंधुनो आपल्याला नेहमीच ७/१२ व ८अ ची गरज भासत असते. आता बऱ्याच  ठिकाणी स्कॅन केलेले  ७/१२ व ८ अ ऑनलाईन दयावे लागतात. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या ७/१२ व ८अ काढता येणार आहे. हे ७/१२ डिजिटल असल्यामुळे त्यावर तुम्हाला तलाठी च्या  सहीची आवश्यकता नाही. तुम्ही डाउनलोड केलेले ७/१२ व ८अ सर्व शासकीय कामासाठी वापरता येणार आहे. खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या शेताचे ७/१२ व ८अ  काढू शकता.  digitalsatbara.mahabhumi.gov.in  वर जा.Regular Login मध्ये जाऊन तुम्ही तुमचा Login Id व Password  तयार करून घ्या. किंवा  OTP Based Login वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका व OTP  टाकून लॉगिन करू शकता. यामध्ये तुम्ही डिजिटल ७/१२, ८ अ , डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड व डिजिटल स्वाक्षरी केलेले इ फेरफार काढू शकता.  👉 ७/१२ काढण्यासाठी  जिल्हा  तालुका  गाव  सर्वे नंबर/ गट नंबर सर्वे नंबर/ गट नंबर हिस्सा निवडा.  👉 ८ अ  काढण्यासाठी  जिल्हा  तालुका  गाव  खाते क्रमांक (माहित नसल्यास नावानुसार शो...

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत शेततलाव

  मुख्यमंत्री शाश्वत कृषी कृषि सिंचन योजने अंतर्गत शेततलाव       एकूण ८२ टक्के शेतकरी सर्वस्वी अवलंबुन असलेली कोरडवाहू शेती आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित खंड हि नैसर्गिक आपत्ती आहे. यासाठी सिंचनाची  सोया व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेकऱ्यांसाठी शेत तलावाची योजना सुरू केली आहे. सन २०२२ - २३ या आर्थिक वर्षाकरिता १३५०० वैयक्तिक शेततळे करण्याचे उद्दिष्ट ठरले आहे. पात्रता १. अर्जदार स्वत:च्या नावावर ०.६० हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे २. अर्जदाराची जमीन तांत्रिक दृष्टया योग्य असावी. ३. शेतकरी अर्जदाराने या पूर्वी शेत तलावासाठी इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  अर्ज सादर करण्याची पद्धत  कृषी विभाग महाडीबीटी या पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावे.   लाभार्थी निवड  कृषी विभागाने विकसित केलेल्या mahadbt पोर्टल वर प्राप्त अर्जाची सांगणकीय प्रणाली द्वारे सोडत निघेल.  कागदपत्र फक्त करण्यासाठी १. ७/१२ २.८अ ३.आधार कार्ड ४. पासबुक ५. मोबाईल नंबर   इनलेट आउटलेटसह व इनलेट आउट लेट व...

प्रधानमंत्री पिक विमा योजना तक्रार

 प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात 2016 पासून राबविण्यात येत आहे.  योजनेची उद्दिष्टे १. नैसर्गिक आपत्ती किडी आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. २. पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ३. कृषी क्षेत्रासाठी च्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकाचे विविधकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.   खरीप हंगाम  भात,ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर,मका, भुईमूग, कारळे, तीळ,सूर्यफूल,सोयाबीन,कापूस,कांदा.  रब्बी हंगाम  ज्वारी, हरभरा, उन्हाळी,भुईमूग,  कांदा इ पिकांचा समावेश आहे.  जर आपण प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये भाग घेतला असेल आणि  आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर 72 तासाच्या आत आपल्याला कंपनीला फोन कॉल, ई-मेल  किंवा ॲप माध्यमाद्वारे आपल्या पिकनुकसानीची  माहिती  द्यावी लागते. शासनाने जिल्हा निहाय विमा कंपन्या...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला मिळाली मंजुरी आता सर्वांना मिळणार फळबाग लागवड ...

              आज भारताची लोकसंख्या १२५ कोटी पेक्षा जास्त आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार  अन्न धान्य, भाजीपाला, फळे यांची गरज  वाढत आहे. त्यानुसार गरजांची पूर्तता होण्यासाठी कृषी क्षेत्रांतुन अधिक उत्पादन होणे अपेक्षित आहे. तसेच पडीक क्षेत्रावर, शेताच्या बांधावर, लागवड होणे गरजेचे आहे. या उद्देशाने   महाराष्ट्र शासन कृषी विभाग नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी सांगड घालून फळबाग लागवड योजना राबवत आहे. परंतु ही योजना फक्त जॉब कार्ड धारक करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी फक्त २.०० हे. मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकतात. त्यामुळे बहुतेक शेतकरी वरील अटी मुळे इच्छा असूनही लाभ घेऊ शकत नाही.         २०१८ पासून ही  योजना चालू केली होती. पण मध्ये काही वर्ष निधी उपलब्ध न झाल्यामुळं स्थगित केली होती पण ४ ऑक्टोबर २०२२ रोजी शासन निर्णय काढून पुन्हा प्रशासकीय मंजुरी  सन  २०२२-२०२३ साठी दिली आहे.  उद्देश  शेतकर्याना...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना १२ वा हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचे नाव यादीत आहे की नाही असे चेक करा.

 PM KISAN  (प्रधानमंत्री किसान सन्मान योजना) डिसेंबर २०१८ पासून शेतकरी कुटुंबाला  (कुटुंबाची व्याख्या पती,पत्नी व त्यांची अल्पवयीन १८ वर्षाखालील मुले)  पाठबळ देण्यासाठी  केंद्र शासनाने ह्या  योजनेला सुरवात केली. या योजेनेसाठी १०० टक्के केंद्र शासन अर्थ सहाय्य करते.  सुरवातीला अल्प व अत्यल्प जमीनधारक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवले पण नंतर मात्र सर्वाना या योजेचा लाभ दिला. या योजनेतून  प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर आर्थिक मदत म्हणून तीन हप्त्यात वर्षाला ६०००/- रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात येत आहे.   गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच २०००/- जमा झाले होते. परंतु या वेळेस अजून जमा झालेले नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी पात्र नसताना हि नाव नोंदणी केली होती. त्यामुळे EKYC  बंधनकारक करावी लागली. त्यामुळे जवळपास ४० लाख शेतकऱ्यांनी  EKYC केली नाही. तसेच भूलेख पडताळणी चे काम चालू होते. या महिन्यात  म्हणजेच ऑक्टोबर २०२२ मध्ये १२ वा   हप्ता जमा होणे अपेक्षित आहे.   १२ वा हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचे नाव य...

MAHADBT या योजनेत अर्ज करून मिळवू शकता शेती उपयोगी सर्व अवजारे

शेतकरी बंधुनो एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घायचा असल्यास सर्व कागदपत्र गोळा करून सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. हा सर्वसामान्य जनतेचा अनुभव आहे. यातून मुक्त होण्यासाठी कृषि विभागाने MAHADBT पोर्टल सुरु केले आहे. तुम्हाला कृषि विभागाच्या कार्यालयात  जाण्याची गरजच आता राहिली नाही.  आणि कागपत्रेही द्यायची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता. कृषी विभागाने MAHADBT  या online  पोर्टल वर सर्व योजना एकाच अर्जात आणल्या असून तुम्ही एकदा अर्ज करून तुम्हाला  आवश्यक असणाऱ्या ट्रॅक्टर पासून ते फवारणी पंप पर्यंत सर्व यंत्र सामुग्री तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इंजिन, मोटार, पाईप या सर्व घटकासाठी या प्रणाली वर अर्ज करू शकता.  अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.  १. आधार कार्ड २. ७/१२  ३. ८ अ  ४ बँक खाते क्र आणि IFSC Code  ५. आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर (लिंक नसल्यास बायोमेट्रिक मशीन लागेल) असा करा अर्ज mahadbtmahait Farmer Login  या साईट वर जा. किंवा खालील लिंक वर क्लीक करा.  https://mahadb...

Business करायचाय.... शासन देतेय १० लाखांपर्यंत अनुदान

  l प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  (PMFME) केंद्र शासनाच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहीम अंतर्गत सन २०२०-२०२१ ते २०२४-२५ या पाच वर्षासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेला सुरवात केली आहे. नवीन  व्यवसाय सुरु  करण्यासाठी किंवा पूर्वीचा व्यवसाय वाढवण्यासाठी शासन हि योजना राबवत आहे. उद्देश   ⟶ असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रकिया उद्योग मुख्य प्रवाहात आणणे. नाशवंत कृषि मालावर प्रक्रिया करून मालाचे मूल्यवर्धन होऊन उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे. पारंपारिक स्थानिक उत्पादने जपवणूक करून त्यांचा प्रचार व प्रसार करणे. महिला स्वयंसहाय्यता गटामार्फत महिलांना सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे. उत्पादनावर प्रक्रिया,पॅकेजिंग, मार्केटिंग व ब्रँडिंग यासाठी साह्य करणे.  लाभार्थी ⟶ १. शेतकरी/युवक /उद्योजक २. शेतकरी उत्पादक संस्था ३. शेतकरी उत्पादक कंपन्या ४. सहकारी संस्था ५.स्वयंसहायता गट व त्यांचे संघ ६. शासकीय संस्था   समाविष्ट उद्योग धंदे ⟶        आंबा,द्राक्ष,डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, चिंच, जांभूळ, फणस, करवंद, काजू, तृण ...

पाने गुंडाळणारी अळी अर्थात बग्या

  पाने गुंडाळणारी अळी अर्थात बग्या    लक्षणे-  पाने गुंडाळणारी अळी पानावरील हरितद्रव्य खरडून  खात असल्यामुळे भाताचे पाने पांढरे पडलेले दिसतात तसेच पाने दुमडलेले दिसतात याला स्थानिक भाषेत बग्या असे म्हणतात.  एकात्मिक व्यवस्थापन-  बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत. ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीटकाची 50,000 अंडी प्रतिहेक्‍टरी पिकामध्ये सोडावीत.  प्रत्येक चुडात 1 ते 2 नवीन कीडग्रस्त पाने दिसल्यास प्रतिहेक्‍टरी  हायड्रोक्‍लोराईड 500 ग्रॅम   किंवा                  क्‍लोरपायरीफॉस (20 टक्के) 1875 मि.लि.     किंवा  क्विनॉलफॉस (25 ईसी) 1000 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा 👇🏻👇🏻 https://youtu.be/k4TcATs68BY

पावसाची उघडझाप !!!! भात पिकावर होतोय या किडीचा प्रादुर्भाव

     भातावर विविध प्रकारचे किडी रोग आपणास दिसून येत असतात. या वर्षी परतीचा मान्सून लांबलेला दिसून येत आहे. त्यामुळे पावसाची उघडझाप आणि दमट वातावरणामुळे काही ठिकाणी दुधाळ अवस्थेत असलेल्या  हळव्या भातावर गंधी  बग /ढेकण्या चा प्रादुर्भाव दिसून येतो. याला स्थानिक भाषेत पोपट्या असे बोलतात. ओळख -      या किडीची ओळख रंग तांबूस हिरवट, पाठीवर त्रिकोण, तोंडावर दोन स्पर्शीका (मिशीसारखी). जवळ जाताच उडतो. हात लावल्यास दुर्गंधी येते. ही सकाळी किंवा संध्याकाळी आढळून येते. नुकसान पद्धत -       भात पिकाच्या लोंबीवरील पीक दुधाळ अवस्थेत असताना प्रौढ ढेकण्या व त्याची लहान पिल्ले दाण्याला छिद्र पाडून आतील रस (दूध) शोषून घेतात. त्यामुळे दाणा भरताना काळा पडलेला दिसतो. दाणे पोचट राहतात आणि लोंब्या अर्धवट भरतात. अशा दाण्यावर एक सूक्ष्म छिद्र दिसून येते व छिद्राभोवती काळपट, तपकिरी ठीपका तयार होतो. आर्थिक   नुकसान पातळी - प्रती चूड १ ढेकण्या दिसल्यास आर्थिक नुकसान पातळी ओलांडली अशी समजावे.  कीड नियंत्रण - १. बांधावरील गवत कापून बांध स्वच्छ ठेव...